बदले उत्सवाचा, सगळाच रागरंग!

(माझा पहिला लेख... सकाळच्या सप्तरंग पुरवणीतला. यंदाच्या गणेशोत्सवात तीस वर्षे झाली त्याला...)

थंड पडलेल्या समाजाला उठवायचे, तापवायचे, एकत्र आणायचे आणि त्यातून आपले राजकीय आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करायचे, या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला चालना दिली, आणि तो खऱ्या अर्थाने ‘सार्वजनिक’ केला. या उत्सवामागची खरी प्रेरणा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय आणि समाजिकच अधिक असल्यामुळे उत्सवामध्ये जनजागृती करणअयाच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम सादर होऊ लागले. गणपतीपुढे भजन, कीर्तन, प्रवचन यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणे साहजिकच होते. ती त्या समाजाची गरज होती. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे होते ते निरनिराळे मेळे, शाहिरी पथके यांचे कार्यक्रम. कारण ती त्या काळाची गरज होती.
प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी हे मेळए प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्या वेळेचे वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या काळात गणेशोत्सवात ते स्वतःही भावगीत गायनाचे कार्यक्रम करीत होते. त्वाह्चा उत्सव, त्याचे स्वरूप यांविषयी ते सांगतात, “वेगळाच होता तो गणेशोत्सव! सक्तीची वर्गणी, गणपती पुढची नाच-गाणी, सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवरची गणपतीची गाणी, असा प्रकार त्या वेळी नव्हता. तेव्हा शिस्त महत्त्वाची होती. तेव्हाचे कार्यक्रमही अतिशय चांगले असत. दहा-दहा दिवस गणपतीपुढे कीर्तन, भावगीत गायन, पोवाडे, मेळे चा


Read more...