पाळतशाहीचे महाजाल





रात्रीची वेळ. दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. नॉर्थ लंडनमधील एका सदनिकेतून दोघे जण बाहेर पडले. हे घर होते एका माजी सैनिकाचे. त्याला भेटण्यासाठी या दोन व्यक्ती येणार हे ब्रिटिश गुप्तचरांना आधीच समजले होते. त्यातील एकावर एमआय-फाईव्ह या गुप्तचर संस्थेच्या हेरांची आधीपासूनच पाळत होती.

ते दोघे जण रस्त्यावर आले. कारमध्ये बसून व्हिक्टोरिया स्टेशनच्या दिशेने ते निघणार, तोच बाजूच्या काळोखात दबा धरून बसलेल्या आठ पोलिसांनी त्यांना घेरले. स्पेशल ब्रँचचे ते पोलिस. त्यांनी या दोघांचीही झडती घेतली. एकाच्या हातात ब्रीफकेस होती. ती जप्त केली. दोन वेगवेगळ्या गाड्यांत त्यांना टाकण्यात आले. या दोघांनाही राष्ट्रीय गोपनीयता कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

हे दोघेही पत्रकार होते. एकाचे नाव क्रिस्पिन ऑब्री आणि दुसऱ्याचे डंकन कॅम्पबेल. जॉन बेरी या माजी सैनिकाची मुलाखत घेऊन ते चालले होते. काही वर्षांपूर्वी त्याने सायप्रसमध्ये ब्रिटिश लष्कराच्या सिग्नल्स इंटेलिजन्सविभागासाठी - सिगिंट म्हणतात त्याला - काम केले होते. त्याच्याकडून ती माहिती घेण्यासाठी ते गेले होते. सुमारे तीन तास ते त्याच्याशी बोलत होते. ते बोलणे ध्वनिमुद्रित करीत होते. आता तो सांगत असलेली माहिती तशी जुनीच झाली होती. कॅम्पबेल यांच्यासाठी तर ती विशेषही नव्हती. ब्रिटनच्या जीसीएचक्यूचा गौप्यस्फोट करणारे ते पत्रकार. त्यांना त्यात काय नवे वाटणार?

हे जीएसीएचक्यू म्हणजे गव्हर्नमेन्ट कम्युनिकेशन हेडक्वार्टर. चेल्टनम शहरातील दोन मोठ्या इमारतींमधून या संस्थेचे काम चालत असे. ते काम होते इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ संदेशवहनावर नजर ठेवण्याचे, ते संदेश चोरून ऐकण्याचे. आजवर लोकांच्या दृष्टीने ब्रिटनच्या सर्वांत मोठ्या हेरसंस्था होत्या त्या एमआय-फाईव्ह किंवा एमआय-सिक्स. पण तो समज चुकीचा आहे. जीसीएचक्यू हीच सर्वांत मोठी हेरसंस्था आहे आणि अमेरिकेच्या एनएसएच्या म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या हातात हात घालून ती पाळतीचे काम करीत असते. ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी जीसीएचक्यू आणि एनएसएची मॉनिटरिंग स्टेशन आहेत. सरकारने आजवर लपवून ठेवलेली ही माहिती कॅम्पबेल यांनी महत्प्रयासाने मिळविली आणि मे १९७६ मध्ये टाइम आऊटया मासिकातील एका लेखातून ती फोडली. त्या लेखाचे नाव होते - द इव्ह्जड्रॉपर्स.’ - चोरून ऐकणारे.

हा लेख वाचून मोठी खळबळ माजली,


Read more...

चकमकींचे एन्काऊंटर


बनावट चकमकींद्वारे न्यायाची अपेक्षा करणा-यांच्या हे लक्षातच येत नाही, की यातून आपण व्यवस्थेच्या तालिबानीकरणाला वा आयसिसीकरणालाच हातभार लावत आहोत. या अशा व्यवस्थेत अखेर बळी जातात ते कोण्या धनदांडग्यांचे, कोणा बळवंतांचे वा सत्ताधीशांचे नव्हेत. त्याची शिकार असतात ते सामान्य निरपराध नागरिकच. तुमच्या-आमच्यासारखे लोक. छत्तीसगढमधील त्या गावांत तेच तर घडले होते. त्या दोन चकमकींची ही कहाणी...

यातील पहिली वृत्तकथा लिहिली होती २०१९ साली, दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीमध्ये. 

दुसरी आहे द वायर मराठीत गेल्या रविवारी, १० ऑक्टो. २०१९ ला प्रसिद्ध झालेली. 

वाचा - 

१ : एका चकमकीची गोष्ट 

(https://lekhankamathi.blogspot.com/p/blog-page_11.html)

२. एका चकमकीची (आणखी एक गोष्ट) 

(https://lekhankamathi.blogspot.com/p/blog-page_97.html)

(द वायर मराठी - https://marathi.thewire.in/the-story-of-an-encounter)

 

       




Read more...

बदले उत्सवाचा, सगळाच रागरंग!

(माझा पहिला लेख... सकाळच्या सप्तरंग पुरवणीतला. यंदाच्या गणेशोत्सवात तीस वर्षे झाली त्याला...)

थंड पडलेल्या समाजाला उठवायचे, तापवायचे, एकत्र आणायचे आणि त्यातून आपले राजकीय आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करायचे, या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला चालना दिली, आणि तो खऱ्या अर्थाने ‘सार्वजनिक’ केला. या उत्सवामागची खरी प्रेरणा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय आणि समाजिकच अधिक असल्यामुळे उत्सवामध्ये जनजागृती करणअयाच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम सादर होऊ लागले. गणपतीपुढे भजन, कीर्तन, प्रवचन यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणे साहजिकच होते. ती त्या समाजाची गरज होती. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे होते ते निरनिराळे मेळे, शाहिरी पथके यांचे कार्यक्रम. कारण ती त्या काळाची गरज होती.
प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी हे मेळए प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्या वेळेचे वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या काळात गणेशोत्सवात ते स्वतःही भावगीत गायनाचे कार्यक्रम करीत होते. त्वाह्चा उत्सव, त्याचे स्वरूप यांविषयी ते सांगतात, “वेगळाच होता तो गणेशोत्सव! सक्तीची वर्गणी, गणपती पुढची नाच-गाणी, सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवरची गणपतीची गाणी, असा प्रकार त्या वेळी नव्हता. तेव्हा शिस्त महत्त्वाची होती. तेव्हाचे कार्यक्रमही अतिशय चांगले असत. दहा-दहा दिवस गणपतीपुढे कीर्तन, भावगीत गायन, पोवाडे, मेळे चा


Read more...

रॉ विषयी आणखी काही...






अॅमेझॉनवरही आहे ते. 
त्यासाठी येथे क्लिक करा. 



रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा या पुस्तकाबद्दल नियतकालिकांतून, समाजमाध्यमांतून, तसेच ब्लॉगमधून बरेच लिहिले गेले. 
आनंदाचा भाग हा, की त्यातील सर्वच प्रतिक्रिया चांगल्या, पुस्तकाचे स्वागत करणाऱ्या होत्या. 

त्यांपैकी हे लेख. पहिला 'जनपरिवार' मध्ये प्रकाशित झालेला. जॉन कोलासो यांच्यासारख्या जाणत्या व्यक्तीने तो लिहिलेला आहे. 




तरुण आणि अभ्यासू पत्रकार नामदेव अंजना यांनीही या पुस्तकाबद्दल भरभरून लिहिले. आपल्या ब्लॉगनामा मध्ये ते लिहितात - 
काश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं?’ या प्रश्नाची अपार चलती असताना, रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.
वाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


कर्ण उर्फ सौरभ यांनी त्यांच्या गप्पिष्ट या ब्लॉगमध्ये लिहिला आहे. त्यात ते म्हणतात - 
सध्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूरस कथा सांगणारे भक्तिरसाने ओतपोत असे बरेच सिनेमे निघत आहेतते मला फारच सुमार वाटतात. गुप्तहेर संघटनेचं काम इतकं ग्लॅमर्स नसत याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या असल्या सिनेमांपासून मी दोन हात दूरच राहतो.चांगल्या पुस्तकाचा शोध हा मराठीत लिहिलेल्या रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा” या पुस्तकावर येऊन थांबला. हे पुस्तक रवि आमले यांनी लिहिले आहे. पुस्तक आपल्याला सुरुवातीपासूनच खेळवून ठेवते...या पुस्तकात रॉ च्या फक्त यशस्वी कारवाया आहेत असे लेखकाने आधीच नमूद केल्याने पुस्तक एकतर्फी वाटत नाही...
ज्यांना भारतीय राजकारणगुप्तहेर संघटनात्यांच्या कारवाया यांबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक योग्य आहे.
श्रीजीवन तोंदले यांनी त्यांच्या पुस्तक एक्स्प्रेस या ब्लॉगमध्येही त्यांच्या वाचकांना रॉचा परिचय करुन दिला आहे. त्यात ते लिहितात - 
२९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४ प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो.
त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  

याबरोबरच प्रीतम कातकर, मुंबई यांनी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक पेजवर या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 

गणेश कुबडे यांनी त्यांच्या माझे मनोगत या ब्लॉगमध्ये या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यात ते म्हणतात - 
स्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील  पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…!अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...
माझे मनोगतवरील हा लेख येथे वाचता येईल. वाचनवेडा या पुस्तकप्रेमींच्या फेसबुक पेजवर सिद्धार्थ जाधव यांनीही या लेखाची लिंक दिली आहे. 

याशिवाय अनेक वाचकांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून या पुस्तकाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. हे सर्व फार भारी होते... 
या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.






Read more...

पाऊस : पडद्यावरचा...

(लोकप्रभासाठी (५ ऑगस्ट २०१३) लिहिलेला हा लेख. ललित वगैरे ढंगातला. खरं तर परीक्षाच होती ती. आज त्याचंही हसूच येतंय... पण मज्जाही वाटतेय... ललितबिलित जमल्याची...) 



पाऊस. 
वर्षा. बारिश. रेन.
त्याचेही अनेक प्रकार.
कधी भुरभुरता. कधी भुताळा.
कधी मुसमुसता, दुःखाच्या मंद सुरांसारखा,
तर कधी मुसळधार, उमड घुमड बरसणारा.
पाऊस टीनच्या छतावर जलतरंग वाजवणारा.
रान आबादानी करणारा . मन सुलगवणारा.
रहमानांच्या जलरंगी चित्रांसारखा.

पण कुठे असतो हा पाऊस?
हा असा काव्यमय पाऊस ज्यांच्या गावात पडतो ते भाग्यवानच म्हणायचे.
आमच्या बीपीएल डोळ्यांना पाऊसधारांतले हे सौंदर्य कधी दिसतच नाही.
सौंदर्य पाहणा-याच्या डोळ्यांत असते असं म्हणतात. खरेच असेल ते. नाही तर आपला पाऊस असा कसा असता?  गद्य, संपादकीय पानावरच्या लेखांसारखा!

तसे आम्हीही मनातल्या मनात नन्ना रे नन्ना रे करत बरसो रे मेघा म्हणतोच की. पण त्या प्रत्येक ये रे ये रे पावसाला एका प्रार्थनेची पार्श्वधूनही असते आमच्या मनी. की, पड बाबा. हवाच आहेस तू. पण अवेळी धिंगाणा घालू नकोस. सकाळी ऐन कचेरीसमयी कोसळू नकोस. तेवढी लोकल अडवू नकोस. पण तो का आपलं ऐकणा-यातला असतो? पूरग्रस्त गावातल्या माणसांप्रमाणेच वेधशाळेला धाब्यावर बसवतो तो. तिथं आपलं सामान्यांचं आर्त काय ऐकणार तो? माणसाच्या हुकूमाचा ताबेदार असायला तो थोडाच चित्रपटातला पाऊस असतो?


Read more...