गांधी नावाचा गुन्हेगार!

  
या ३१ जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्यांचे अनावरण करायचे हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते हे आता हिंदुस्थानातील किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधुंची संख्या वाढवत न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदु मातांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.

Read more...

आपली प्राचीनातली उड्डाणकला!

आपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवीसन पूर्व दोन हजार ते चौदाशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणतः चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधु संस्कृती त्याही आधीची. इ.पू. ३२०० ते २६५० हा तिचा काळ आणि त्या काळात त्या लोकांनी नगरे उभारली. तेथे विकास नियंत्रण कायदे होते की काय हे कळायला मार्ग नाही, पण आजच्या आपल्या शहरांहून त्यांची रचना किती तरी पटीने उत्तम होती. अशी दृष्टी, अशी स्थापत्यकला माहित असलेली माणसे मोठीच असणार. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे जाऊन उपनिषदांसारखे तत्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्षप्रमाण सिद्धांत आपल्या लोकप्रिय धार्मिक तत्वज्ञानाला किती पटतात हा भाग वेगळा, पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्वेद आणि आयुर्वेद यांसारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक नियम नक्कीच ठावूक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण घेतो, पण जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. साधारणतः इ.पू. ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्वे दिली. लाईफ ऑफ पाय हे तर आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या किती तरी आधी पायची अगदी अचूक किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले हे तर आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबविता येते. पण अलीकडे काही जणांना ही यादी ताणण्याचा छंद जडला आहे.

Read more...

वस्तुनिष्ठतावादाचा पाया...



द फाऊंटनहेड. लेखिका आयन रँड.
डझनभर प्रकाशकांनी हे पुस्तक नाकारलं होतं. एकाने हिंमत दाखवली. प्रकाशित केलं आणि या पुस्तकाने इतिहास घडवला. विकिपेडियावर विश्वास ठेवायचा तर आजवर या पुस्तकाच्या साडेसहा कोटी प्रती खपल्या आहेत. हा झाला अधिकृत प्रतींचा आकडा. पण उच्च नीतिमूल्यांचा संदेश देणा-या या पुस्तकाच्या अनधिकृत प्रतीही कोटींच्या संख्येने विकत गेल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीतरी कुणीतरी या पुस्तकाबद्दल सांगतं. आपण ते मिळवतो. वाचतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक आपल्याला झपाटतं. आजवर मनावर कोरण्यात आलेल्या तत्वविचारांबाबत शंका निर्माण करतं. धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच भूमिका तपासून घ्यायला लावतं. हे गेली सात दशकं असंच सुरू आहे. यापुढेही अनेकांच्या विचारांवर ही कादंबरी आणि रँड यांचा ऑब्जेक्टिव्हिजम असाच परिणाम करीत राहील. एवढी परिणामकारक, एवढी नावाजलेली ही कादंबरी. तिच्यावर तेवढ्याच प्रमाणावर टीका झाली आहे, ती तेवढीच धिक्कारली गेली आहे. असं काय आहे या कादंबरीत की अनेकांना तिची भीती वाटते? ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते? या कादंबरीच्या या यशाचं गमक कशात आहे? हे नेमकं काय रसायन आहे? हे पाहण्यासाठी आधी आपल्याला दुस-या महायुद्धापर्यंत जावं लागेल. 

Read more...