पुलं इतिहासजमा झाले आहेत काय?

(पूर्वप्रसिद्धी - रविवार लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २०११)

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय?


Read more...

आम्ही हतबल!

या क्षणी मनात फक्त प्रश्‍नांचं जंजाळ आहे...
का? आम्हीच का? मुंबईच का?

माहीत आहे, की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्यावर घाव घातला, की तो सर्वांच्याच वर्मी बसतो. पण तरीही का?

म्हणजे घाव घालायला काही कारण तर पाहिजे. नुसतीच दहशत पसरवायची? निरुद्देश? पण हेही माहीत आहे, की उद्देशहीन काहीही नसतं. पण "त्यांना' जे हवंय ते देणं कुणाच्याही हाती नाही. कोणालाच ते शक्‍य नाही, हे तर लख्ख स्पष्ट आहे; पण तरीही ते जीव खाऊन घाव घालत आहेत.

ते कोण करतं, म्हणजे कोणती संघटना करते, इंडियन मुजाहिदीन की लष्कर-ए-तय्यबा याला खरं तर तसा काहीही अर्थ नाही. दहा तोंडांचा साप. कोणत्या तोंडानं चावला, यानं काय फरक पडतो? सगळे सारखेच आहेत. सगळे एकच आहेत. प्रश्‍न इतकाच आहे, की त्यांना हवंय तरी काय? फक्त सूड? कुठल्या तरी क्रियेवरची केवळ प्रतिक्रिया? सध्या तरी तसंच दिसत आहे; पण हे सूडचक्र असं किती काळ फिरत राहणार? सृष्टीच्या अंतापर्यंत?
प्रश्‍न आणि बरेच प्रश्‍न...


Read more...

कसा लागला लादेनचा पत्ता?

दहा वर्षे अमेरिका लादेनच्या शोधात होती.
कोणी म्हणत होते, तो अफगाणिस्तानातल्या तोराबोराच्या पहाडांमध्ये लपला आहे. त्या पहाडांमध्ये अंडरग्राऊंड बंकर्स आहेत, टनेल्स आहेत. त्यात तो आहे.
कोणी सांगे, तो पाकिस्तानतल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे. तेथील आदिवासी टोळ्यांचं संरक्षण त्याला आहे.
कोणी सांगे, तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे. मधूनमधून अशाही बातम्या उठायच्या, की त्याला किडनीचा गंभीर आजार आहे. त्यातच औषधोपचाराअभावी त्याचा मृत्यु झालाय.
पण अशा बातम्या आल्या, की काही दिवसांनी अल् जझीरावर लादेनची टेप झळकायची. मग ती टेप खरी की खोटी अशी चर्चा सुरू व्हायची...
एकूण सगळाच गोंधळ होता.

Read more...

होळीपुराण

होळी तोंडावर आलीय...
त्या दिवशी कचेरीला सुटी. तेव्हा काय करायचं, कुठं जायचं, कुणाबरोबर जायचं, कुणाला टाळायचं, याचे बेत ठरू लागलेत... अशा वेळी सहजच मागे एकदा होळीवर खरडलेलं काही आठवलं...
साम मराठीवरच्या काय सांगताय काय या स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठीचं ते स्क्रिप्ट होतं... वाटलं ते पुन्हा इथं टाकावं... (त्या शिमग्याची याद म्हणून)!

 १.

नमस्कार मित्र हो,
आज सकाळची गोष्ट. असा नुकताच उठून, स्नान वगैरे करून मी चहाच्या कोपाबरोबर पेपर घेऊन बसलो होतो. तोच दारावर टकटक झाली. अशी दारावर सुतारपक्षासारखी टकटक करणारांचा मला अतोनात संताप येतो.
का नाही येणार? नाही नाही, का नाही येणार?
एवढी हौसेने आम्ही दारावर नवी बेल बसवलीय. पण हे लोक ती घंटी नाही वाजवणार. दार बडवणार!
बरं दार वाजवण्याचीही काही एक पद्धत असावी ना! असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे! आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी! मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय? दरवाजाच्या भक्कमपणाची परीक्षा घेताय काय?

या लोकांची दारावरच्या घंटीशी काय दुश्मनी असते कोण जाणे? याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना? मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत? पण म्हणतात ना - पडिले वळण...! याच्या उलट सोसायटीतली पोरं. हात पोचत नसला, तरी उड्या मारमारून बेल वाजवणार.
असाच एकदा दुपारचा झोपलो होतो. तर बेल! पाहतो तो सोसायटीतला एक नाकतोडा. म्हटलं, बेटा, आपको कौन चाहिये?
तर तो म्हणाला, कोई नही!
म्हटलं, अरे मग द्वाडा, बेल का बडवलीस?
तर तो मख्ख आवाजात म्हणाला, चालू आहे की नाही पाहात होतो!!

तर दारावर टकटक झाली. आम्ही कवाड खोललं, तर समोर एक हिरवा-निळा-नारिंगी-सोनेरी चेहरा!

Read more...