त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...
संतांची फॅक्टरी
Populus vult decipi – ergo decipiatur.t
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.)
कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.
Read more...
Labels:
God,
Godman,
hindu,
loksatta,
Mother Teresa,
ravi amale,
ravi amle
चला, संशयात्मा होऊया..
‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसतो.’
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.
अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.
Read more...
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.
अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.
Read more...
Labels:
Gobbels,
indian history,
Lokprabha,
Myth,
Newton,
ravi amale,
Social Media
मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!
बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.
काशीबाई ही पेशव्यांची पत्नी. तशात ती एका पायाने अधू. त्यात पुन्हा तो काळ. सोवळ्या ओवळ्याचा, पडदागोशाचा. तेव्हा काशीबाई काही अशा नाचणार नाहीत. असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. पण हे म्हणताना मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ती पेलायची तर त्याकरीता मस्तानी कोण होती येथून सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी गंभीर साधनांद्वारे इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे. मनावरील कादंबरीमय इतिहासाची आणि ऐकीव आख्यायिकांची भूल उतरवून फेकावी लागणार आहे. खरा तोच इतिहास दाखवा असे संजय लीला भन्साळीला बजावताना खरा तो इतिहास जाणून घेण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. शिवाय हे केवळ तेवढ्यावरच भागणारे नाही. आपल्यासमोर जो इतिहास पुराव्यांच्या पायावर सध्या उभा आहे तो पचविण्याची कुवत आपल्याला दाखवावी लागणार आहे. अशी ताकद खरोखरच आपल्यात आहे का?
Read more...
Labels:
Bajirao-Mastani,
indian history,
Maratha,
Marathi Film,
Mastani,
Peshve
निमित्त मस्तानी
मस्तानीबाबत तर तिच्या हयातीतच अनेक कंड्या पिकविण्यात आल्या होत्या. ती राजकन्या. पण तिला वेश्या ठरवले गेले. ती मुस्लिम नव्हे. ती प्रणामी पंथाची. पण तिला मुस्लिम ठरविण्यात आले. तो पेशवाईतील एका मोठ्या कटाचा भाग होता आणि त्यात बाजीरावांच्या मातोश्री, बंधु चिमाजी आप्पा आणि पुत्र नानासाहेब यांचा हात होता. हा कट एवढा किळसवाणा होता, की त्यात मस्तानीचे नानासाहेबांबरोबर म्हणजे तिच्या मुलाबरोबरच प्रेमसंबंध असल्याचे दाखवून तिचा काटा काढण्याचाही प्रयत्न झाला होता. आज हा कट काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि मस्तानीची कलावंतीण म्हणून प्रतिमा तेवढीच शिल्लक उरली आहे....
Read more...
Labels:
Bajirao-Mastani,
indian history,
Maratha,
Marathi Film,
Mastani,
Peshve
एक होता आनंदमार्ग...
ही फक्त माहिती आहे.
सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची. या माहितीचा आजच्या
कोणत्याही संघटनेशी ताळमेळ जुळला तर कृपया तो योगायोग मानू नये. कारण अशा सर्व
संघटना, त्यांचा उदय, विकास, त्यांची कार्यपद्धती स्थूलमानाने सारखीच असते. फरक
फक्त तपशीलात असतो. आशय तोच असतो. तो आज समजून घ्यायचा, कारण त्यामुळे या
संघटनांचे खरे स्वरूप समजणे सोपे जाईल.
Read more...
Labels:
anand marg,
Conspiracy,
Godman,
hindu,
India,
indian history,
indian intelligence,
Lokprabha,
loksatta
गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर
स्वातंत्र्यवीर
सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम
संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता.
त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष
मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी
सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या
सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला.
मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही.
समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा
आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष
मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर
त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द
करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान
सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी
पुढाकार घ्यावा.
मोरे यांचा तीव्र
आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या
अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found
not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग
म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच
नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग
आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या
परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.
गांधीहत्या कटाचा
निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम
गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले
होते.
Read more...
कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?
ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.- मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५
सण आणि उत्सव
सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय
मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत
कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की
या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात
प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी
१८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू
करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही
फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये
राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या
उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा
उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे
वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे
शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने,
लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या
धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.
Read more...
राधेमाँचे कुठे काय चुकले?
बहुत ज्ञाती नागवलीं।
कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच
मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी
म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त
होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न
कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००
काळ बाजारीकरणाचा
आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा
केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी
पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे
पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो.
राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक
ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा
अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो
काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.
Read more...
हवा भयगंडाची...
ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय?
Read more...
Read more...
Labels:
drought,
environment,
indian history,
Lokprabha,
loksatta,
maharashtra,
Psudo Science,
rigved,
war
मिथक निर्मितीचा कारखाना
ही योजना तशी जुनीच. मिथक निर्मिती हा तिचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
Read more...
मुस्लिमांपुढील आव्हान
जगाचा धार्मिक रंग
बदलतो आहेत.
रंगांचा वापर आपण
प्रतिकांसारखा करतो. म्हणजे हिंदू म्हटले की भगवा, मुस्लिम हिरवा. तर हा हिरवा रंग
भराभर पसरतो आहे. सध्याचे लोकसंख्यावाढीचे प्रमाण असेच राहिले, तर पुढच्या ३५
वर्षांत जगभरातील मुस्लिमांची लोकसंख्या ख्रिश्चनांच्या लोकसंख्येशी बरोबरी करू
लागेल. म्हणजे एकविसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन आपण पाहिले तर जगात मुस्लिमांची
लोकसंख्या २८० कोटी असेल. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के
आहे. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी असेल. हे प्रमाण ३१ टक्के आहे. यामुळे तिकडे
युरोपात मोठीच उलथापालथ होणार आहे. तेथे दर दहा व्यक्तींमागे एक जण मुस्लिम असेल.
आणि अमेरिकेत. तेथेही तसेच. मुस्लिमांचे प्रमाण वाढणार आहे. ज्यूंपेक्षा त्यांची
संख्या लक्षणीय असेल.
आता यात हिंदू धर्म
कुठे आला?
Read more...
Labels:
hindu,
India,
indian history,
jihad,
Lokprabha,
loksatta,
maharashtra,
muslim,
Nathuram Godse Partition,
population
गांधी नावाचा गुन्हेगार!
या ३१ जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी
यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या
पुतळ्यांचे अनावरण करायचे हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये
पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच
अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते हे आता हिंदुस्थानातील
किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका
नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत
आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे
उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधुंची संख्या वाढवत
न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदु मातांनी अष्टपुत्रा
सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा
गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.
Read more...
Labels:
India,
Lokprabha,
loksatta,
Mahatma,
Mahatma Gandhi,
Nathuram Godse Partition,
ravi amale,
RSS
आपली प्राचीनातली उड्डाणकला!
आपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवीसन पूर्व दोन हजार ते
चौदाशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणतः चार-साडेचार हजार
वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधु संस्कृती
त्याही आधीची. इ.पू. ३२०० ते २६५० हा तिचा काळ आणि त्या काळात त्या लोकांनी नगरे
उभारली. तेथे विकास नियंत्रण कायदे होते की काय हे कळायला मार्ग नाही, पण आजच्या
आपल्या शहरांहून त्यांची रचना किती तरी पटीने उत्तम होती. अशी दृष्टी, अशी
स्थापत्यकला माहित असलेली माणसे मोठीच असणार. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे जाऊन
उपनिषदांसारखे तत्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्षप्रमाण सिद्धांत आपल्या
लोकप्रिय धार्मिक तत्वज्ञानाला किती पटतात हा भाग वेगळा, पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्वेद
आणि आयुर्वेद यांसारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक
नियम नक्कीच ठावूक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण
घेतो, पण जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. साधारणतः
इ.पू. ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्वे दिली. ‘लाईफ ऑफ पाय’ हे तर आपल्या
पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या किती तरी आधी पायची अगदी अचूक
किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले हे तर आता बालवाडीतील मुलेही
सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबविता येते. पण अलीकडे काही जणांना ही
यादी ताणण्याचा छंद जडला आहे.
Read more...
वस्तुनिष्ठतावादाचा पाया...
द फाऊंटनहेड. लेखिका
आयन रँड.
डझनभर प्रकाशकांनी
हे पुस्तक नाकारलं होतं. एकाने हिंमत दाखवली. प्रकाशित केलं आणि या पुस्तकाने
इतिहास घडवला. विकिपेडियावर विश्वास ठेवायचा तर आजवर या पुस्तकाच्या साडेसहा कोटी
प्रती खपल्या आहेत. हा झाला अधिकृत प्रतींचा आकडा. पण उच्च नीतिमूल्यांचा संदेश
देणा-या या पुस्तकाच्या अनधिकृत प्रतीही कोटींच्या संख्येने विकत गेल्या आहेत.
महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीतरी कुणीतरी या पुस्तकाबद्दल सांगतं. आपण ते
मिळवतो. वाचतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक आपल्याला झपाटतं. आजवर मनावर
कोरण्यात आलेल्या तत्वविचारांबाबत शंका निर्माण करतं. धार्मिक, अध्यात्मिक,
आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच भूमिका तपासून घ्यायला लावतं. हे गेली सात दशकं असंच
सुरू आहे. यापुढेही अनेकांच्या विचारांवर ही कादंबरी आणि रँड यांचा
ऑब्जेक्टिव्हिजम असाच परिणाम करीत राहील. एवढी परिणामकारक, एवढी नावाजलेली ही
कादंबरी. तिच्यावर तेवढ्याच प्रमाणावर टीका झाली आहे, ती तेवढीच धिक्कारली गेली आहे.
असं काय आहे या कादंबरीत की अनेकांना तिची भीती वाटते? ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा
दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते? या कादंबरीच्या या ‘यशा’चं गमक कशात आहे? हे नेमकं काय रसायन
आहे? हे
पाहण्यासाठी आधी आपल्याला दुस-या महायुद्धापर्यंत जावं लागेल.
Read more...
Labels:
Ayn Rand,
Fountainhead,
loksatta,
Objectivism,
ravi amale
Subscribe to:
Posts (Atom)