आंदोलन फोडण्याचे शास्त्र


संप, बंद, मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण हे आंदोलनाचे काही प्रकार. ही आंदोलने सहसा केली जातात अन्यायाविरोधात. काही मागण्यांसाठी. काही बदल घडवून आणण्यासाठी. त्या मागण्या कायदेशीरदृष्ट्या योग्य की अयोग्य, तो अन्याय खरा की काल्पनिक वगैरे भाग वेगळा. त्या चर्चेत शिरता केवळआंदोलनआणि तेही प्रस्थापित व्यवस्था वा सरकार यांविरोधात केलेले आंदोलन याचा विचार केला, तर एक बाब लक्षात येते. ती म्हणजे आंदोलन कुणाचेही असो, ते पुकारणाऱ्यांकडे, त्यात सहभागी होणाऱ्यांकडे, ते संपकरी, ते मोर्चेकरी, ते उपोषण करणारे, निदर्शक यांच्याकडे अन्य समाज ज्या दृष्टीने पाहतो, ती दृष्टी मोठ्या प्रयत्नाने खास कमावून देण्यात आलेली आहे. त्याचे एक साधेसे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी झालेल्या आणि गाजलेल्या एका मोठ्या संपाकडे पाहता येईल



Read more...

नेताजी - सावरकर भेटीची मिथ्यकथा


एखादे असत्य इंटरनेटवर वारंवार प्रसिद्ध झाले, कीएआयलाही ते सत्य वाटू लागते! प्रोपगंडातील या गोबेल्सी तंत्राचा उत्तम नमुना म्हणजे नेताजी-सावरकर संबंधांविषयीची सुरस आणि चमत्कारिक कहाणी. गेल्या अनेक वर्षांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेअपहरणकरण्याचा प्रयत्न हिंदुत्त्ववाद्यांनी चालवला आहे. नेताजी हे मूळचे समाजवादी. डावे. आजच्या हिंदुत्त्ववाद्यांच्या शब्दावलीनुसार त्यांना अर्बन नक्सल असेही म्हणता येईल. पण ते क्रांतिकारी. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी पं. नेहरूंपासून दूर करून हिंदुत्त्ववाद्यांचेआयकॉनवि. दा. सावरकर यांच्या शेजारी बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही मिथ्यकथा हा त्याचाच एक भाग


या कथेचा प्रारंभबिंदू आहे २२ जून १९४०. या दिवशी सायंकाळी दादर येथीलसावरकर सदना या दोन नेत्यांची भेट झाली. या कथेतील सत्याचा हा सर्वांत मोठा भाग. कोणताही प्रोपगंडा हा सत्याच्या अंशावर उभा असावा लागतो. तो हा अंश. त्यावर पुढची, या भेटीत या दोन नेत्यांची जी चर्चा झाली, त्याबाबतची मिथ्यकथा उभी आहे. काय होती ती चर्चा?  



Read more...