एखादे असत्य इंटरनेटवर वारंवार प्रसिद्ध झाले, की ‘एआय’लाही ते सत्य वाटू लागते! प्रोपगंडातील या गोबेल्सी तंत्राचा उत्तम नमुना म्हणजे नेताजी-सावरकर संबंधांविषयीची सुरस आणि चमत्कारिक कहाणी. गेल्या अनेक वर्षांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ‘अपहरण’ करण्याचा प्रयत्न हिंदुत्त्ववाद्यांनी चालवला आहे. नेताजी हे मूळचे समाजवादी. डावे. आजच्या हिंदुत्त्ववाद्यांच्या शब्दावलीनुसार त्यांना अर्बन नक्सल असेही म्हणता येईल. पण ते क्रांतिकारी. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी व पं. नेहरूंपासून दूर करून हिंदुत्त्ववाद्यांचे ‘आयकॉन’ वि. दा. सावरकर यांच्या शेजारी बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही मिथ्यकथा हा त्याचाच एक भाग.
या कथेचा प्रारंभबिंदू आहे २२ जून १९४०. या दिवशी सायंकाळी दादर येथील ‘सावरकर सदना’त या दोन नेत्यांची भेट झाली. या कथेतील सत्याचा हा सर्वांत मोठा भाग. कोणताही प्रोपगंडा हा सत्याच्या अंशावर उभा असावा लागतो. तो हा अंश. त्यावर पुढची, या भेटीत या दोन नेत्यांची जी चर्चा झाली, त्याबाबतची मिथ्यकथा उभी आहे. काय होती ती चर्चा?
Read more...